107+ Marathi Suvichar । मराठी सुविचार


•━───────────────────────━•

प्रत्येक झाडाने फळ द्यायला हवं हे गरजेचं नाही
एखाद्या झाडाची सावलीसुद्धा खुप आधार देऊन जाते.

•━───────────────────────━•

संकटातुन वाचल्याशिवाय जिवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्या शिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतू कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत.
 
•━───────────────────────━•

•━───────────────────────━•

शेतीमध्ये बी पेरले  नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार  भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.

•━───────────────────────━•

आयुष्य हे सुंदर जीवन जगण्यासाठी मिळालेलं आहे,सहज उधळण्यासाठी नाही.

•━───────────────────────━•

ज्याला आयुष्याची किंमत कळली तो आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला सुवर्णसंधी समजतो.

•━───────────────────────━•

सोन्यामध्ये जसे रत्न कोंदले तर सोन्याची किंमत वाढते तसे आयुष्यातील प्रत्येक क्षणाची रत्नासारखी मांडणी असेल तर मनुष्याचे अवघे जीवन झळाळून उठते.

•━───────────────────────━•

कुणाचीही ताकद तो किती मोठा आहे यावर कधीचं अवलंबून नसते. अहो, जो डोळ्यांनी दिसत नाही अशा एका सूक्ष्मजीवाने अख्ख्या जगाला वेठीस धरलंय.. काळजी घ्या.

•━───────────────────────━•

आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनःशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा.

•━───────────────────────━•

प्रयत्न हा परिस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येतं. भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण आधिक चांगले मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

•━───────────────────────━•

वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही.
कारण वेळ "चांगली" असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ "खराब" असेल तर "आपले" पण "परके" होतात. वेळच माणसाला "आपल्या" व  "परक्याची" ओळख करून देते.

•━───────────────────────━•

मानवी नात्यात जर सर्वात मोठा "शत्रू "कुणी असेल
तर तो म्हणजे "गैरसमज"!!
 
•━───────────────────────━•

सराव तुम्हाला बळकट बनवतो. दुःख तुम्हांला माणूस बनवते. अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते. 

•━───────────────────────━•

शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो... कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही... पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर भले भले डोंगर हि फोडून निघतात, असे ध्येय ठेवा.

•━───────────────────────━•

मन गुंतायला वेळ लागत नाही , मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला.

•━───────────────────────━•

स्वाभिमानाचा लिलाव करुन मोठं होण्यापेक्षा, अभिमानाने लहान राहणं, कधीही चांगलं.

•━───────────────────────━•

छोटसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा, जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात.

•━───────────────────────━•

कंदील जरी सुर्याची बरोबरी करु शकत नसला तरी अंधारात त्याच महत्व सुर्याइतकच असतं. त्यामुळे स्वत:ला कधीच कमी समजू नका.

•━───────────────────────━•

माणसांचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं,जितकं पुस्तकांचा संग्रह करणं. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते.

•━───────────────────────━•

चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर, जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. शून्यलाही किंमत देता येते फक्त त्याच्यापुढे “एक” होऊन उभे राहा…!!

•━───────────────────────━•

कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण म्हणजे आयुष्य.

•━───────────────────────━•

पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात.

•━───────────────────────━•

जगावे तर बुद्धिबळातल्या वजीरा सारखे कारण संपूर्ण खेळात समोरच्या बादशहाला भीती आणि दहशत हि वजीराचीच असते राजाची नाही.

•━───────────────────────━•

संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाही.

•━───────────────────────━•

तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही तुमच्या आयुष्यात काही गोष्टी फक्त एकदाच घडतात म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची कदर करा.

•━───────────────────────━•

माणसाजवळ त्याच्या आयुष्य भराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार हेच चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात.

•━───────────────────────━•

दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतःकरणातल देवपण हे संपल की माणूस संपला.

•━───────────────────────━•

आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो हीच  आयुष्याची गंमत आहे.

•━───────────────────────━•

मदत ही अशी बाब आहे , केली तर विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवतात.

•━───────────────────────━•

स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की,परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे.

•━───────────────────────━•

संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत असते.

•━───────────────────────━•

अंदाज चुकिचा असू शकतो पण अनुभव कधीच चुकिचा असू शकत नाही कारण अंदाज आपल्य मनाची कल्पना आहे तर अनुभव आपल्या जीवनातील सत्य आहे.

•━───────────────────────━•

प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत कधीच अडथळा  निर्माण करत नाही आणि दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा  कधीच प्रगती करत नाही.

•━───────────────────────━•

थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते. पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही, म्हणून शरीर थकले तरी चालेल परंतु मनाला कधी थकून देऊ नका.

•━───────────────────────━•

 वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे. म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका दोन्ही बदलणार आहे.

•━───────────────────────━•

शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतील.

•━───────────────────────━•

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलो पावली येतील कठिण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका.

•━───────────────────────━•

आयुष्यात बालपण फक्त सुखाचं असतं. कारण अहंकारापासून ते लांब असतं. "हम कुछ है" हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर तर्क, झुंज, स्पर्धा आणि संघर्षच .

•━───────────────────────━•

वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोड़ा पण जवळची माणसं तोडू नका, कारण स्वप्न परत येतात पण माणसं कधीच परत येत नाहीत.

•━───────────────────────━•

मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना, घास असावा समाधानाचा, तरच आनंद मिळेल जीवनाचा.

•━───────────────────────━•

प्रत्येकाचा "आदर" करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक आहे, ती आपल्याला व्याजासकट नक्की  परत मिळते.

•━───────────────────────━•

"प्रतिष्ठित" व्यक्तिपेक्षा "चारित्र्यसंप्पन" व्यक्ती हा कधीही सरसच ठरतो, कारण "चारित्र्य" हे मूलभूत संस्काराने उपजत मिळालेले असते तर "प्रतिष्ठा" ही इतरांनी त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते.

•━───────────────────────━•

कोणतीही गोष्ट न चिडता, न रागवता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खुप सोप्पं आहे, पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड.

•━───────────────────────━•

माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे, तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या,व सुखाने जगा.

•━───────────────────────━•

आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व असतं. कारण जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे साठवली जाते ती दौलत असते व जपली जातात ती आपली माणसं असतात.

•━───────────────────────━•

नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते.

•━───────────────────────━•

माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहिजे लोकांच काय ,लोक तर देवात पण चुका काढतात.

•━───────────────────────━•

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात पण चालणारे आपण एकटेच असतो. पडल्यावर हसणारे अनेकजण असतात पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.

•━───────────────────────━•

कोणाच्या बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या चुका शोधू नका कारण त्या शब्दापेक्षा त्याच्या भावना अनमोल असतात शब्द ठरवता येतात भावना ठरवून येत नाहीत.

•━───────────────────────━•

कोणी कोणाला काही द्यावे ही , अपेक्षा नसते दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते.

•━───────────────────────━•

नात्यांना खूप सुंदर आवाजाची आणि चेहऱ्याची गरज नसते, गरज असते ती सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची.

•━───────────────────────━•

राग आल्यावर तो व्यक्त करणे जितके सोपे असते त्याहून कितीतरी कठीण असते ते म्हणजे शांत राहून त्यावर संयम ठेवणे आणि संयम ठेवणे ज्याला कळलं त्याला जगण्याचा खरा अर्थ समजला.

•━───────────────────────━•

परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेली ही असतात.

•━───────────────────────━•

कडकडुन भुक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते, आणि भरल्या पोटी पंचपक्वान्नही नकोसं होतं तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं.

•━───────────────────────━•

आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण इथं पुन्हा "once more" किंवा "pause" option नसतं.

•━───────────────────────━•

डोळे आणि भावनिक स्पर्श..शब्दांपेक्षा छान बोलतात..अट एकच समोरच्याला ते समजुन घेण्याच्या भावना असल्या पाहीजेत.

•━───────────────────────━•

शब्दांनाही स्वतःचे असे तापमान असते ते कोणत्या वेळी कसे वापरले जातात यावरून कळते की ते शब्द जळणार आहेत की थंडावा देणार आहेत.

•━───────────────────────━•

आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच काही लोक तुमचे पाय पकडायला सुरवात करतात.

•━───────────────────────━•

देह सर्वांचा सारखाच फरक फक्त विचारांचा या छोटयाशा आयुष्यात स्वतःला असे बनवा की लोक तुमच्या कड़े एकमेव उपाय म्हणून पाहतील पर्याय म्हणून नाही.

•━───────────────────────━•

आयुष्यात कधीही स्वत:ला कुणापेक्षा कमी समजू नये आणि कुणापेक्षा श्रेष्ठही समजू नये.कारण स्वत:ला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो.

•━───────────────────────━•

सगळी दु:ख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे मन प्रसन्न करा सगळी दु:ख दूर होतील.

•━───────────────────────━•

आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे.

•━───────────────────────━•

घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहते पण जेव्हा सगळेच स्वतःला मोठे समजू लागतात  तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही.

•━───────────────────────━•

संस्कारांच्या तालमीत शिकलेले डाव माणसांना जीवनात कधीच हारू देत नाहीत.

•━───────────────────────━•

मनातील माणसं आणि पायातील बूट इजा करत असतील तर समजून जावं ते आपल्या मापाचे राहिले नाहीत.

•━───────────────────────━•

शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की, जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते.

•━───────────────────────━•

फुले नित्य फुलतात. ज्योती अखंड उजळतात. आयुष्यात चांगली माणसे नकळत मिळतात. तोडणं हा क्षणाचा खेळ असतो. पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो.

•━───────────────────────━•

प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतील ही पण त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो.

•━───────────────────────━•

जगातलं कटु सत्य हे आहे की नाती जपणाराच  नेहमी सर्वांपासून दुरावला जातो.तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे.

•━───────────────────────━•

सल्ला घ्यायचाच तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्या कारण यशस्वी काय करायचं ते सांगतो आणि अयशस्वी काय करू नये ते सांगतो.

•━───────────────────────━•

आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात फक्त चुका मान्य करायची हिम्मत पाहिजे.

•━───────────────────────━•

नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.

•━───────────────────────━•

सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख माणसाच्या धैर्याची. 
दोन्ही परीक्षा मध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो.

•━───────────────────────━•

कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता समोरच्याला सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं.
कारण समोरच्या वर चिडणं खूप सोप्पं आहे पण त्याच मन न दुखावता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड.

•━───────────────────────━•

मोर नाचताना सुद्धा रडतो. आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही. आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.

•━───────────────────────━•

आयुष्यातील झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा विसरू नका. यशस्वी होण्याचा नियम एकच आहे, तो म्हणजे लोक काय  बोलतील, हा विचार करणं सोडून द्या.

•━───────────────────────━•

 जो फरक औषधांनी पडत नाही, तोच फरक दहा मिनिटं ज्यांच्याशी बोलून पडतो ना तीच आपली माणसं असतात.

•━───────────────────────━•

आवश्यक्तेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात - नशीब
सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात - दुर्दैव
आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात - आयुष्य

•━───────────────────────━•

नेहमी सत्याच्या मार्गाने चला या मार्गाने अपघात कमी होतात. कारण या मार्गाने येणार्‍यांची संख्या फार कमी असते.

•━───────────────────────━•

चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही ही आवश्यक असतात चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात.

•━───────────────────────━•

समजवण्या पेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजून घेण्यासाठी अनुभवचा कसं लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

•━───────────────────────━•