जबाबदारी आणि कर्तव्य ( भाग्यलेखा कारंडे )

            स्वतःला ट्रेंड करण्यासाठी दररोज एका मयताला आहुती देऊन; त्याची राख होईपर्यंत त्याला कवटाळत बसणे . तास-न-तास त्या विचारात गढुन जाऊन , स्वत:च्या अमूल्य अश्या टाईमला दुसऱ्याच्या हवाली करून स्वतःच आयुष्य बर्बाद करणं कितपत योग्य वाटते; जरी एक फॉर्म्यालिटी म्हणून आपण ते केले तरी कोणाला त्याची कदर नसते; म्हणून आपण आपल्याच विश्वात जगून स्वतःला साध्य होईल; तेवढ्या उंचीची गगनभरारी घेऊन स्वतःला सिद्ध करून दाखवणे आणि स्वतःच अस्तित्त्व निर्माण करून खऱ्या जगण्याचं सार्थक झाले असे म्हणता येईल . 
           
            नाहीतर , उगाच तोंडातील माशी तोंडातच घुटमळत ठेवत , जणू काय तोंडाला मास्क लावून तोंड बंद चे लेबल लावलय ? असं वागण्यात काहीही पूर्णतः सिद्ध होणार नाही . 

          जगले तर स्वावलंबी जगायचं . कोणाच्या जीवावर जगून दिवस काढले तरी जमेल त्या पद्धतीने त्याची परतफेड करायला, स्वतःच मन सक्षम ही करणे हे ही तितकेच गरजेचे आहे . शेवटी आपलं आयुष्य आहे बाकी सर्व  नाती एक फॉर्म्यालिटी म्हणून एकमेकांची केसाळलेली गरज या ना त्या नात्याने एकमेकांत गुंतलेली असतात . 

         जबाबदारी आणि कर्तव्य यापलीकडे वेगळ्या विश्वात वावरून  स्वतःच अस्तित्त्व आहे. याची जगाला जाणीव करून देणे गरजेचे आहे नाहीतर; सतत स्वतःला डिवचून मरेपर्यंत ती सल मनात घर करून राहणार , याची शाश्वती अगदी दारात बसलेलं कुत्र सुद्धा  देऊन रिकामे होईल.....सो "स्व-अस्तित्त्वाची ओळख जगाला 
करून देणे" ,  एक ठाम असे मनावर बिंबवणारे वाक्य आहे . 
त्याला पूर्णतः केल्याशिवाय कोणतीही माघार घेता येणार नाही.

                     लेखिका - भाग्यलेखा कारंडे, सोलापूर